प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर लिखित "अनोख्या रेशीमगाठी" ही कादंबरी आज वाचून झाली. या कादंबरीमध्ये सरांनी "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय इतका सुबकपणे हाताळला आहे की एका बैठकीत कादंबरी कधी वाचून झाली ते समजलंच नाही.
"पृथ्वीवरील स्वर्ग" असलेल्या आंजर्ले गावाचे यथार्थ चित्रण वाचून आपल्याला अगदी कोकणात गेल्यासारखं वाटते.
कोकणातल्या आजीची दूरदृष्टी आणि सकारात्मकता तर अगदी योग्य प्रकारे रेखाटली आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी आपल्या सर्वांना या आजीसारखा विचार करण्याची गरज आहे.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल श्री. रवींद्र कामठे सरांचं खूप खूप
अभिनंदन
आणि हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment