"चपराक कडून लवकरच येत असलेल्या रवींद्र कामठे यांच्या 'तारेवरची कसरत' या चरित्रात्मक पुस्तकाला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची प्रस्तावना आहे. व श्री. संतोष घोंगडे सरांनी अतिशय समर्पक असे मुखुपृष्ठ साकारले आहे. कामठे सर आणि युवा कवी गणेश आटकळे यांच्यासह आज सरांकडे गेलो. प्रस्तावना घेतली. शेजवलकर सरांचे माझ्यावर आणि अर्थातच 'चपराक'वर विलक्षण प्रेम आहे. थोरामोठ्यांचे असे आशीर्वादच तर नवनवे प्रयोग करायला बळ देतात";
असे घनश्याम पाटील म्हणतात.
शेजवलकर सरांनी आम्हांला त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांनी लिहिलेली प्रस्तावना चपराक प्रकाशन च्या उपस्थितीत माझ्या कडे सुपूर्द केली. व्यवस्थापनातील शिस्तबद्धता व काटेकोरपणाचा प्रत्यय आला.
शेजवलकर सरांच्या पुस्तकांचा अभ्यास करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेला त्यांचा मी रविंद्र कामठे एक शिष्य किती भाग्यवान आहे हे तुम्हीं समजूच शकत नाही. आज सरांनी माझ्या चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या "तारेवरची कसरत" ह्या अनुभव कथन पुस्तकास त्यांची अतिशय बोलकी आणि समर्पक प्रसावना देऊन मला धन्य केले आहे. अर्थातच ह्याचे श्रेय चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे आहे. त्यांच्या मुळेच माझ्या ह्या पुस्तकाला शेजवलकर सरांची प्रस्तावना मिळाली. हा माझ्या साठी फार मोलाचा असा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थाने मी आता साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो असे मला सरांनी दिलेल्या ह्या प्रस्तावाने मुळे वाटते. खूप खूप धन्यवाद शेजवलकर सरांचे. वयाच्या ९२ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवील इतका उत्स्हास आणि कामाचा ध्यास पाहून धक्क व्हायला होते. आज माझे कैलासवासी वडील असते तर त्यांनाही खूप अभिमान वाटला असता त्यांच्या ह्या मुलाचा हे नक्की.
सरांनी अतिशय उत्स्फुतपणे त्यांची ही प्रस्तावना आम्हांला ऐकवली व ती रेकॉर्ड करण्याची संधी दिली. वयाच्या ९२ व्या वर्षीही सरांचा उत्स्हास आणि जोश पाहून आम्हीं तर अचंबितच झालो होतो.
ही ध्वनी चित्रफित तुम्हीं खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता
चपराक प्रकाशन च्या घनश्याम सरांचे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा एक क्षण आहे जो माझ्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारा ठरेल असे वाटते. आज मी खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो. माझ्यासाठी शेजवलकर सरांची ह्या प्रस्तावानेच्या निमित्ताने मिळालेली ही शाबासकीच आहे . मला मिळालेल्या ह्या संधीचा मी नक्कीच योग्य तो उपयोग करून घेऊन साहित्य क्षेत्रात माझे योगदान देऊ शेकेल असे वाटते.
श्री. संतोष घोंगडे सरांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या ह्या पुस्तकासाठी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ करून ह्या पुस्तकाच्या साहित्यमूल्यात मोलाची भर टाकली आहे.
माझ्या ह्या पुस्तकाचे चपराकच्या साहित्य महोत्सवात समारंभपूर्वक प्रकाशन १९ ऑक्टोंबर २०१९ रोजी सायं ७ वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यलय, सदाशिव पेठ येथे होणार आहे. त्यासाठी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माझ्याकडून आपल्याला हे ह्या कार्यक्रमाचे निमित्रण समजावे.
रविंद्र कामठे.