मातृतुल्य रसिक वाचक सौ. शकुंतला जोशी ह्यांची माझ्या "प्रांजळ" काव्यसंग्रहास मिळालेली कौतुकाची थाप.
सौ. शकुंतला
श्यामसुंदर जोशी (वय ७४) कसबापेठ पुणे,
ह्यांचा चपराक प्रकाशन पुणे ह्यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहाला दिलेला अनमोल असा
अभिप्राय त्यांच्याच शब्दांमध्ये पुनर्मुद्रित करून माझ्या सर्व रसिक वाचकांसाठी
खाली देत आहे.
हा अभिप्राय
मला त्यांनी स्वत: लिहिलेल्या आंतरदेशीय पत्राद्वारे पाठविला आहे, तो जसाचा तसा शब्दांकित करून
हा अनमोल ठेवा जतन करू इच्छित आहे. माझ्यासाठी हा एक
फार मोठा पुरस्कारच आहे. असे रसिक वाचक आहेत म्हणूनच तर आपले मराठी साहित्य जिवंत
आहे असे म्हणलो तर अतिशयोक्ती होणार नाही.
पत्र
क्रमांक ७९९२ | वार –बुधवार | वेळ – स. ७ | तिथी – तृतीय | दिनांक – २ मे २०१८
सन्माननीय,
श्री.
रविन्द्र दादा,
सौ.
वंदनाताई,
स.न.वि.वि.
कुटुंबियांना
यथोचित स.न.अ.शु.आ.
मी
आपला “प्रांजळ” काव्यसंग्रह वाचला.
काव्यसंग्रह
वाचल्याची कारणे-
- मनोरंजक २) रंजकता ३) वाचनीय ४) संग्राह्य ५) मननीय ६) चिंतनीय ७) ह्रुद ८) स्तुत्य ९) सार्थ नाव १०) प्रेरणादायी १०) अर्थपूर्ण ११) प्रत्येक कविता वेगळी १२) उत्तम लेखन शैली १३) सुसुगता १४) सुसंबद्धता १५) उत्तम शब्द भांडार १६) गेयता १७) प्रासादिक १८) अभ्यास १९) सिद्धहस्त लेखणी २०) समर्थ लेखणी २१) उत्तम कल्पकता २२) उच्च कल्पना २३) स्वागतार्ह २४) वेधक २५) भावोत्कटता २६) भारावून गेले २७) प्रभावित झाले २८) प्रगल्भता २९) लालित्य ३०) लोभस ३१) वास्तवता ३२) सकारात्मक ३३) आत्मकेंद्रित ३४) विविधता ३५) प्रत्येक कविता वेगळी ३६) संवेदनाक्षम ३७) सुसंवाद ३८) सुसूत्रता ३९) अनुभवसिद्ध लेखणी ४०) उत्तम मांडणी ४१) आत्मकेंद्रित ४२) अलीपृता ४३) मातीचे शेतीचे नाते सांगणाऱ्या कविता ४४) सृजनता ४५) मनाला भावणारा काव्यसंग्रह.
माझ्या
पत्रसंग्रहात अनेक साहित्यिक,
रसिक, राजकीय, कलाकार
बंधू भागीनीची पत्रे आहेत. त्या पत्रसंग्रहाला मी “फुलोरा” नाव दिले आहे. त्या
फुलोरा पत्रसंग्रहात आपले पत्र यावे ही इच्छा. आपण
पत्र पाठवावे ही विनंती. आपले पात्र येईल असा विश्वास.
आपले पत्र येण्याने आनंदाभिमान वाटेल. आपले पत्र येण्याने
फुलोरा फुलेल ! बहरेल ! शान वाढेल.
आपल्या
पत्राची वाट पाहणारी
आपली
भगिनी
सौ.
शकुंतला जोशी (वय ७४).
ह्या
अभिप्रायास माझ्या कुवतीने मी दिलेले उत्तरही खाली देत आहे....
आदरणीय सौ. शकुंतला शामसुंदर जोशी,
अमेय अपार्टमेंट, मुजुमदार बोळ, कसबा पेठ,
पुणे – ४११०११
स.न.वि.वि,
सौ. शकुंतलाजी, सर्वप्रथम
आपल्या चरणी माझा नमस्कार अपर्ण करतो तो स्वीकारून मला उपकृत करावे.
आपण सस्नेह लिहिलेले आंतरदेशीय पत्र मिळाले. “चपराक प्रकाशन”
पुणे
ह्यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहावरील आपला उत्स्फूर्त
अभिप्राय वाचून मनाला खूप खूप आनंद झाला.
आपण माझा हा काव्यसंग्रह वाचल्याची नमूद केलेली ४५ कारणे म्हणजे माझ्या ह्या
कलाकृतीला लाभलेले ४५ आशीवार्द्च आहेत असे मला अगदी मनापासून वाटले.
आपण माझ्या आईच्या वयाच्या आहात हे तुम्हीं पत्रात नमूद केलेल्या आपल्या
वयानुसार समजले आणि आपल्याबद्दलचा माझ्या मनातला आदर द्विगुणीत झाला हे मात्र
नक्की. आजवर असा
अभिप्राय कोणाला लाभला असेल असे मला तरी वाटत नाही आणि त्याबद्दल मी स्वत:ला
भाग्यवान समजतो. ह्या पृथ्वीतलावर आईच्या आशीर्वादाशिवाय मोठा कुठलाच पुरस्कार
नाही. आपला हा
आशीवार्द माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कारच आहे असे मला वाटते.
आपल्या “फुलोरा” ह्या पत्रसंग्रहात माझ्या ह्या पत्रास जागा
मिळाली हे मी माझे खूप मोठे भाग्य समजतो.
आज मला कळले की, “कलाकार हा कधीच
मोठा नसतो, तर, त्याचे रसिक त्याला मोठा करतात”.
मी आपला खूप खूप ऋणी आहे.
रविंद्र कामठे
पुणे
No comments:
Post a Comment